नूहने लोकांना सांगितले की, चांगले बनण्यासाठी, अल्लाहची आज्ञा पाळा…आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवा की, जर ते चांगले होतील तर ते वापस स्वर्गात जातील…त्याने त्यांना फक्त अल्लाहची प्रार्थना करण्यास सांगितले, जो त्यांना बनविणारा आहे आणि दगडाच्या प्रतिमेची आराधना न करण्यास सांगितले…पण लोक खूप आज्ञा भंग करणारे होते…त्यांनी पुरुषांच्या, स्त्रीच्या, सिंहांच्या, घोड्याच्या आणि खूप काही प्राण्यांच्या पुतळ्यांची आराधना करने चालूच ठेवले…
नूहने त्यांना समजावले की, "हे दगड तुम्हाला काहीही देऊ शकत नाही…जर तुम्हाला काही पाहिजे आहे, तर त्यासाठी अल्लाहला मागा…"
नूह ने कारण दिले, "तुम्ही सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि आकाश पाहत नाही का? यांना कोणी बनविले…अल्लाहने या सर्वांना बनविले…तुम्हाला जाणीव होत नाही का की अल्लाहने तुम्हालाही बनविले आणि तुम्हाला मृत्युनंतर अल्लाहकडेच वापस जायचे आहे…"
नूहने विनवणी केली," मी म्हणत नाही की मी अल्लाहचा दूत आहे…किंवा मला जे अज्ञात आहे त्याचे ज्ञान आहे…मी हेही म्हणत नाही की माझ्याकडे लपलेला खजिना आहे…मी फक्त एवढेच म्हणत आहे की एकाच अल्लाहला माना आणि तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी त्याची आज्ञा पाळा…माझा विश्वास करा…मला या बदल्यात काहीही नको आहे…"
नूह एक खूप सहनशील व्यक्ती होता…त्याने लोकांना उपदेश करून अल्लाहचा संदेश देणे नऊशे (900) वर्षांपर्यंत चालू ठेवले… त्याला खूप मोठे आयुष्य होते…पण फक्त काहीच चांगल्या लोकांनी अल्लाहचा संदेश स्वीकार केला…
नूह खूप नाखूष होता…त्याने अल्लाहकडे प्रार्थना केली…अल्लाह बोलला," नूह, दुःखी होऊ नकोस…तुझ्याकडून जितके झाले तितके तू खूप चांगले काम केले आहे…हे दुष्ट लोकं एक भयानक शिक्षा भोगण्याच्या लायक आहेत…ते नष्ट होतील…त्यांना या शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही…"
अल्लाहने नूहला एका मोठ्या वादळविषयी सांगितले, जे या विश्वास न करणाऱ्या लोकांना जिवे मारेल…अल्लाहने नूहला सल्ला दिला की एक लांब नाव बनव आणि त्यावर स्वतःला आणि तुझ्या अनुयायींना, येणाऱ्या पूरापासून सुरक्षित करण्याची पूर्ण तयारी कर…
जेव्हा लोकांनी पाहिले की नूह नाव बनवीत आहे…ते त्याच्याकडे पाहून हसले…आणि म्हणाले की," तर तू पूरा साठी तयारी करत आहे, नाही का? आणि तू त्यात (नावेत) स्वतःला वाचवशील? हss."..पण नूहने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि नाव बनविणे चालू ठेवले…
जेव्हा नाव तयार झाली, तेव्हा अल्लाहने नूहला आज्ञा केली की, वादळ येण्याआधी, त्याच्या अनुयायींना, आणि सगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, एका जोडीला त्याच्यासोबत, नावेत घेऊन जाण्यास सांगितले…
नूहने, अल्लाहने जी आज्ञा केली होती, ते सर्व केले…पण नूहला त्याच्या मुलाविषयी, कानान विषयी काळजी वाटत होती…ज्याने अल्लाहची आज्ञा पाळली नव्हती…तो विश्वास करणारा नव्हता…. नूहने अल्लाहला विचारले, कानान चे काय होईल?…तो माझ्या कुटुंबातला आहे….तो वाचविला जाईल का?
आणि अल्लाहने उत्तर दिले," नाही, नूह, जो माझी आज्ञा पाळत नाही, तो तुझ्या कुटुंबातला नाही…आणि तुला त्याच्यासाठी वाईट वाटले नाही पाहिजे…तुझे कुटुंब त्यांच्यात आहे ज्यांनी तुझ्या अल्लाहची आज्ञा पाळली आणि तुझीही…
शेवटी जेव्हा सगळी तयारी पूर्ण झाली तेव्हा एक वादळ आले…कुणीही याआधी एवढे मोठे वादळ पाहिले नव्हते…ती एक शिक्षा होती ज्याचे अल्लाहने वचन दिले होते…की जर लोकांनी त्यांची पद्धत( रस्ता) बदलली नाही तर अल्लाह वादळ पाठवेल…खूप जोरदार पाऊस आकाशातून खाली आला (ढग फाटले) आणि जमिनीतून पाणी उफाळून वर आले…
जसे ते सर्व नावेत बसले, नूहने पुन्हा कानानला आवाज दिला…आणि अल्लाहची आज्ञा पाळायला आणि त्याचा संदेश स्वीकार करायला सांगितला ज्यामुळे तो वाचेल…पण कानान खरच फार हट्टी होता…तो म्हणाला," नाही…मी येणार नाही…मी पर्वत चढेन आणि स्वतःला वाचवेन…" पण त्यानंतर लगेच एक मोठी लाट त्यांच्यामध्ये आली आणि कानान, त्याच्या सोबतच्या दुसऱ्या सर्व विश्वास न करणाऱ्या लोकांसोबत मरण पावला…
नूहची नाव जुडी पर्वता जवळ पोहोचली (आताचे अरारात पर्वत जे तुर्कीत आहे)
ते सर्व लोक जे नाव मध्ये होते ते वाचविले गेले…
नूहला दुसरा आदम म्हणतात…कारण जवळपास प्रत्येक जण त्या भयंकर पुरामध्ये मरण पावला होता…फक्त नूह आणि त्याचे काही अनुयायी, या जगात पुन्हा नवीन जीवन सुरू होण्यासाठी वाचविले गेले होते…लोकं एक भयानक शिक्षा भोगण्याच्या लायक आहेत…ते नष्ट होतील…त्यांना या शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही…"
अल्लाहने नूहला एका मोठ्या वादळविषयी सांगितले, जे या विश्वास न करणाऱ्या लोकांना जिवे मारेल…अल्लाहने नूहला सल्ला दिला की एक लांब नाव बनव आणि त्यावर स्वतःला आणि तुझ्या अनुयायींना, येणाऱ्या पूरापासून सुरक्षित करण्याची पूर्ण तयारी कर…
जेव्हा लोकांनी पाहिले की नूह नाव बनवीत आहे…ते त्याच्याकडे पाहून हसले…आणि म्हणाले की," तर तू पूरा साठी तयारी करत आहे, नाही का? आणि तू त्यात (नावेत) स्वतःला वाचवशील? हss."..पण नूहने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि नाव बनविणे चालू ठेवले…
जेव्हा नाव तयार झाली, तेव्हा अल्लाहने नूहला आज्ञा केली की, वादळ येण्याआधी, त्याच्या अनुयायींना, आणि सगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, एका जोडीला त्याच्यासोबत, नावेत घेऊन जाण्यास सांगितले…
नूहने, अल्लाहने जी आज्ञा केली होती, ते सर्व केले…पण नूहला त्याच्या मुलाविषयी, कानान विषयी काळजी वाटत होती…ज्याने अल्लाहची आज्ञा पाळली नव्हती…तो विश्वास करणारा नव्हता…. नूहने अल्लाहला विचारले, कानान चे काय होईल?…तो माझ्या कुटुंबातला आहे….तो वाचविला जाईल का?
आणि अल्लाहने उत्तर दिले," नाही, नूह, जो माझी आज्ञा पाळत नाही, तो तुझ्या कुटुंबातला नाही…आणि तुला त्याच्यासाठी वाईट वाटले नाही पाहिजे…तुझे कुटुंब त्यांच्यात आहे ज्यांनी तुझ्या अल्लाहची आज्ञा पाळली आणि तुझीही…
शेवटी जेव्हा सगळी तयारी पूर्ण झाली तेव्हा एक वादळ आले…कुणीही याआधी एवढे मोठे वादळ पाहिले नव्हते…ती एक शिक्षा होती ज्याचे अल्लाहने वचन दिले होते…की जर लोकांनी त्यांची पद्धत( रस्ता) बदलली नाही तर अल्लाह वादळ पाठवेल…खूप जोरदार पाऊस आकाशातून खाली आला (ढग फाटले) आणि जमिनीतून पाणी उफाळून वर आले…
जसे ते सर्व नावेत बसले, नूहने पुन्हा कानानला आवाज दिला…आणि अल्लाहची आज्ञा पाळायला आणि त्याचा संदेश स्वीकार करायला सांगितला ज्यामुळे तो वाचेल…पण कानान खरच फार हट्टी होता…तो म्हणाला," नाही…मी येणार नाही…मी पर्वत चढेन आणि स्वतःला वाचवेन…" पण त्यानंतर लगेच एक मोठी लाट त्यांच्यामध्ये आली आणि कानान, त्याच्या सोबतच्या दुसऱ्या सर्व विश्वास न करणाऱ्या लोकांसोबत मरण पावला…
नूहची नाव जुडी पर्वता जवळ पोहोचली (आताचे अरारात पर्वत जे तुर्कीत आहे)
ते सर्व लोक जे नाव मध्ये होते ते वाचविले गेले…
नूहला दुसरा आदम म्हणतात…कारण जवळपास प्रत्येक जण त्या भयंकर पुरामध्ये मरण पावला होता…फक्त नूह आणि त्याचे काही अनुयायी, या जगात पुन्हा नवीन जीवन सुरू होण्यासाठी वाचविले गेले होते…
टिप्पण्या